तुकाराम सोनावणे हे एक व्यवसायाभिमुख शेतकरी आहेत. ते प्रत्येक हंगामामध्ये भाजीपाला व फळभाज्यांची पीके घेतात. दरवर्षी खरीप, रब्बी व उन्हाळी अश्या तिन्ही हंगामांमध्ये काकडीचे पीक घेत असतात. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये तापमान कमी झाल्यानंतर काकडी पिकाची वाढ खुंटते व फुलकळींची संख्या कमी होते. तसेच काकडी पिकावर रसशोषक किडी जसे मावा, फुलकिडे, तुडतुडे आणि त्यांच्यामुळे रोगाचा होणारा प्रादुर्भाव या सर्व गोष्टी नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.
चालू रब्बी हंमामामध्ये तुकाराम सोनवणे यांनी काकडीचे वाण - कावेरी व शिवालिका अश्या दोन जातींची निवड केली. काकडी बियाणे टोकण झाल्यापासून 10 दिवसांच्या अंतराने त्यांनी बायोफिट एन.पी.के. व बायोफिट शेत प्रत्येकी 1 लि. 200 लि. पाण्यामध्ये मिसळून ठिबक सिंचनाद्वारे 1 एकर क्षेत्रासाठी दिले.