काही महिन्यांपूर्वी त्यांना नेटसर्फच्या बायोफिट जैविक उत्पादनांची माहिती मिळाली. कर्मवीर यांनी बायोफिट उत्पादने वापरुन शेती करण्याचा निर्णय घेतला. सर्वप्रथम त्यांनी बायोफिट शेत आणि बायोफिट एन.पी.के एकरी 1 लि. प्रमाणे महिन्याच्या पहिल्या रविवारी फवारणी केली. त्याचप्रमाणे बायोफिट स्टिमरिच आणि बायो-99 यांची प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला फवारणी केली. आणि महिन्यातून दोनदा बायोफिट रॅपअपची फवारणी केली.
या सर्वांचा त्यांना पिकावरती चांगला परिणाम दिसून आला. जमिनीमध्ये पाणी साठून रहाण्याची क्षमता वाढली. त्यामुळे गांडूळांची संख्या वाढली आणि गांडूळांमुळे माती भुसभूशीत झाली. बायोफिट स्टिमरिच मुळे पानांचा आकार वाढला, त्याचबरोबर फुलांची गळती थांबून त्यांची संख्या वाढून प्रत्येक फुलाचे फळामध्ये रुपांतर झाले. बायोफिट रॅपअपमुळे यावर्षी फळांवरती पडणारा रोगाचा प्रादुर्भाव नाहीसा झाला. रसशोषक किडी येऊ नयेत याकरीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोफिट इन्टॅक्टच्या 2 वेळा फवारण्या घेतल्या. तसेच त्यांचा रासायनिक खतांवरील खर्च इतरांच्या तुलनेमध्ये कमी झाला.
श्री. कर्मवीर सांगू इच्छितात की, एक शेतकरी म्हणून रासायनिक खतांचा कमीत कमी वापर करुन जैविक पध्दतीने शेतीची उत्पादकता वाढवणे, ही आपली सामाजिक जबाबदारी आहे.