श्री. विठ्ठल अनवट हे एक पदवीधर शेतकरी असून ते दरवर्षी टोमॅटोचे पीक घेतात. चालू वर्षी खरिप हंगामामध्ये त्यांनी 1 एकर क्षेत्रामध्ये (मेघदूत ढज-2048 जातीचे) टोमॅटोचे वाण निवडले होते. त्यांनी रोपांची लागवण जोडओळी पध्दतीने प्लास्टिक मंचिंगचा वापर करुन केली.
त्यांना टोमॅटो पिकाची विशेष काळजी घ्यावी लागत असे. कारण अतीवृष्टी किंवा ढगाळ वातावरणामुळे पिकावर येणारे रोग, फुलकिडे, नागअळी, फळे पोखरणारी आळी व कीड यांमुळे त्यांचे बरेच नुकसान होते. त्यामुळे बुरशीनाशक व किडकनाशकांवर खूप खर्च होत असे. रासायनिक औषधांच्या अतिरिक्त वापरामुळे पिकाची नैसर्गिक प्रतिकारक्षमता, फळाची टिकवणक्षमता कमी होत असे.