अनिल राजाराम येसुगडे हे गेल्या 8-10 वर्षांपासून द्राक्षाची शेती करत आहेत. त्यांच्याकडे द्राक्ष-माणिक चमण आणि सुपर सोनका अश्या दोन वाणांची शेती होते.
द्राक्ष हे एक संवेदनशील पीक असल्यामुळे वातावरणामधील झालेल्या बदलामुळे येणारे रोग उदा. डाऊनी व भुरी, करपा यांच्या नियंत्रणासाठी त्यांना दर 10-12 दिवसांनी रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करावा लागत असे. तसेच पिकावर येणार्या किडी उदा. मिलीबग, कोळी, खोडकिडा, तुडतुडे, मावा इ. च्या नियंत्रणासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागत असे. रासायनिक खतांच्या आणि तणनाशकांच्या अती वापरामुळे जमिन कठिण बनली होती व जमिनीमधील मित्र किटक, जीवाणूंची संख्या कमी झाली होती.